बुधवार, २ मे, २०१८

भटकंती-एक सफर





          शालेय जीवनात मे महिन्याची सुट्टी मिळाली कि चला मामाच्या गावी आणि ते सुद्धा अगदी एक महिना. पण आत्ता मात्र बदलत्या वेळेनुसार हे सर्व हरपलं. आत्ता वाढल्यात त्या दैनंदिन जीवनातल्या शर्यती पण या सर्वात आपलेपणाचा विसर पडू नये हे मात्र सांभाळावे. 

           सकाळी मस्त नारळ-सुपारी च्या बागेत अंघोळ. तिथून निघताच बाजूला कुपणीत असलेली करवंद तोडत घरी आल्यावर खासकरून भाकर-चटणी, पापड व हापूस आंबा ह्या सकाळच्या न्याहारी निमित्त सर्व मुंबईहून गेलेले मित्रमंडळी व भावंड यांच्या सोबत वेळ घालवून, परत भटकंती साठी आप्तेष्टांकडे भेटी निमित्त आमची सुरुवात व्हायायची व नंतर बैलगाडीवरून गुरांना चारा आणण्यासाठी बाय-पास मार्गाला जावे लागायचे. एवढं करता दुपार व्हायायची व नंतर ब्राह्मण भोजन झाल्यावर झोपाळ्यावर निवांत पडून कधी झोप लागायची ते कळायचच नाही. कारण मंद वारा आला कि पानांचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट ह्या सर्व गोष्टींची साथ होती. संध्याकाळी परत गाई-गुरांना घेऊन नदीवर त्यांना अंघोळ घालण्यासाठी मी मुद्दाम मामाबरोबर जात असे कारण गाव काय असतं हे मला मुळापासून अनुभवायचे होते. नंतर मग कधी जमल्यास मित्रांबरोबर क्रिकेट नाहीतर मग आंबे, फणस व काजू काढायला मी मामाबरोबर जंगलात भटकत असे. हे सर्व झाल्यावर मातीत राहून हात-पाय खूप मळलेले असत. नंतर मग मी नदीमध्ये डुबक्या मारायला निघायचो. असा दिनक्रम झाल्यावर संध्याकाळी मामाबरोबर बागेत झाडांना पाणी लावायला जाणे इत्यादी गोष्टी होत असत व नंतर गावी काय... जेवण लवकरच ०८.०० / ०८.३० ला व्हायायचे, तरी सुद्धा रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत आम्ही गावीच हिंडत बसायचो पण हेच आयुष्य परत मिळेल कि नाही ह्यात मात्र पुष्कळ शंका आहे.

          भटकंती म्हणजे माझ्यासाठी नवीन चैतन्यमय रहस्यच! मग गड-किल्ले चढायचे असो किंवा समुद्रकिनारी एकांत बसणे हे मला जास्त प्रेरणादायी वाटते. मुंबईचे जीवन संपूर्णतः विस्कळीत झालेले आहे, यात काय शंकाच नाही. सकाळी ०३.३० च्या वातावरणात असणारा हायवे अगदी हळुवार आणि हाच हायवे सकाळी ०७.३० ते ११.०० वाजेपर्यंत, मग संध्याकाळी सुद्धा तशीच वाहतुकीची कोंडी. मग लांबचा पल्ला गाठणाऱ्या माणसाला एकावेळी दीड-दोन तास तर नक्कीच फुकट घालवावे लागतात. वरून वाढत जाणारं प्रदुषण... छे! वरून दिवसाला टार्गेट्स असणारी कामे पार पाडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य, पण ह्या सर्व गोष्टीला सामोरं जाऊन आठवडा अखेरी एकदा तरी बाहेर फिरणे मनाला फार प्रेरित करते आणि निसर्गाच्या वातावरणात गेल्यास, स्फुर्तीमय जीवनशैली घडवून आणते.

          हा भटकंती नावाचा असणारा प्रकार फार अजब आहे. अजून बरेचगड गड -किल्ले चढायचे आणि बघायचे बाकी आहेत पण श्रीमंत श्री.छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड येथे पोहोचल्यावर अगदी मनापासून समाधान मिळतो. रायगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असून ८२० मीटर उंचीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे महत्व व स्थान पाहून १७ व्या शतकात आपल्या राज्याची राजधानी बनवली. रायगडचे प्राचीन नाव 'रायरी' सुद्धा होते. गडावर खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत चित्त दरवाजा, नाना दरवाजा, मशीदमोर्चा, महा दरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिकाई देऊळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक,  हिरकणी टोक या वास्तू पाहण्यात अगदी मनाला सकारात्मक उर्जा मिळत राहते. अशाप्रकारेच कधी मित्रांसोबत मन झालं तर गड-किल्ले तर कधी बोरीवलीच्या नॅॅशनल पार्क मध्ये निवांत सायकलिंग, पण आजकाल फक्त रविवार सुट्टीचा दिवस मिळतो आणि तो सुद्धा घरीच आराम करून घालवावा लागतो. सध्यस्थिती अशी असतानाही कोकणात जायायची वेळ आली तर ती मी टाळत नाही मग ते महाड, दापोली किंवा रत्नागिरी असो... कोकणाला ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला असून प्रवास करायचा म्हणजे महाडच्या पुढचाच किंवा माणगांव नंतर लोणेरे फाट्यावरून गोरेगांव मार्गे मंडणगड-दापोली वैगेरे, कोकणातले रस्ते म्हणजे सुसाट एकदम आणि विशेष म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा झाडे, मधूनच वीटभट्टी आली कि दरवळणारा व कोकणात असलेल्याची जाणीव करून देणारा गंध व मधूनच त्यात नदी आणी वाहनचालक त्याच्या माहिती सवयी नुसार रस्त्यामधला सफेद पट्टा पकडून गाडी चालवत असतो, हेच दृश्य पावसाळ्यात अनुभवणे म्हणजे स्वर्गातल्या नयनरम्य दृश्यासारखे म्हणता येयील. स्वर्ग काय किंवा नरक काय हे मानवदेहाचा अंत झाल्याशिवाय दिसत नाही, पण भूतलावरचा स्वर्ग म्हणजे कोकणच! आणि ह्या सर्वामध्ये जुने मित्र असले कि आठवली जागृत होऊन प्रवास करणे म्हणजे अजून त्यात मज्जाच मज्जा... तसेच सणवार असले कि गावी जायायला अफाट मज्जा. मग शिमगा, चैत्र शुक्ल पोर्णिमा, पाडवा, गोकुळअष्टमी व गणेशोत्सव सारखे सण म्हणजे एक प्रकारचा नवाश्वास.
         
           "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हि तळटीपा म्हणून तसेच  भारतीय स्वातंत्रलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र लढ्याचे आद्यप्रवर्तक, 'केसरी' आणि 'मराठा' या वृत्तपत्राचे संस्थापक व लेखक, उत्कृष्ट वक्ते आणि स्वातंत्रसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म सुद्धा रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 'चिखलगावी' झाला.या भटकंतीच्या नादात असंख्य गोष्टी शिकता येतात पण आपण त्यात किती शिकतो हे आपल्यावर!

          'श्यामची आई' या पुस्तकात पालगडचा उल्लेख सतत आढळतो. साने गुरुजींचे गाव म्हणजेच दापोली तालुक्यातील 'पालगड' आज गावात साने गुरुजींच्या नावाची प्रार्थमिक व माध्यमिक शाळा आहे.


                                                                                               
                                                                                      --/ चंद्रशेखर सावंत

         

३ टिप्पण्या: