मंगळवार, १५ जून, २०२१

काळदुर्ग



एका विषयासंदर्भात मी फोर्ट रायडर्स च्या व्हॉट्सॲप समूहात एक मेसेज टाकला आणि तितक्यात मला कल्पेशचा पर्सनली मेसेज आला की उद्या काय कुठे बाहेर जाणार आहेस का? कल्पेशने सर्व मला सांगितलं काळदुर्ग च्या संदर्भात लगेच माझा होकार त्याला सांगून, कधी तो सकाळी ट्रेक साठी निघण्याचा दिवस येतोय असं झालेलं. संध्याकाळ पासून झालेली उत्सुकता ही काही मनाला शांत बसू देत नव्हती. रात्री जेवण झाल्यानंतर सकाळी ४.०० चा अलार्म लावला आणि झोपून गेलो.

ट्रेकच्या दिवशी म्हणजे १३ जून रोजी ठीक सकाळी ४.०० ला उठल्यानंतर डोक्यात विचार यायला सुरुवात झाली की सर्व व्यवस्थित होईल ना.. कारण खूप आत्ता मध्ये गॅप सुद्धा पडला आहे.. कोव्हिडमुळे बाहेरचं कसं वातावरण असेल? दुसऱ्या जिल्ह्यात जाताना तिकडचे काय निर्बंध असतील? आपण व्यवस्थित जाऊन येऊ शकतो ना? ह्या सर्वांचं विचार डोक्यामध्ये घोळत होतं. त्यातच माझी २० मिनिटं गेली, पण पुढे सकारात्मक विचार ठेऊन अंघोळ वैगरे झाल्यानंतर नाश्ता पाणी व चहा झाल्यावर कल्पेशला एकदा फोन केला व निघालो. आई तेवढं फक्त म्हणत होती सांभाळून जा आणि सांभाळून ये. सध्याच्या वातावरणाला अनुसरून बाहेर स्वतःची व सवांगड्यांची काळजी घेऊन रहा व नीट घरी ये. मालाड स्टेशनला पोहोचल्यावर कल्पेशचा फोन आला की आम्ही दादर वरून निघालो, बोरिवलीला पोहोच तू. लगेच मी तिकीट काढून बोरिवलीला पोहोचलो. ठरल्याप्रमाणे कल्पेश व त्याचे मित्रमंडळी मला बोरिवलीला भेटले व तिथून आम्ही पालघरच्या पुढील प्रवासासाठी सुरुवात केली. जाताना वाटेल लागणारी भाईंदर ची खाडी व विरार च्या पुढे लागणारी वैतरणा नदी ही मन मोहून घेत होती. एक वेगळ्या प्रकारचा मनाला सुखद आनंद मिळत होता. साधारण ७ च्या आसपास आम्ही पालघर स्टेशनला पोहोचल्यावर गरमागरम कांदापोहे, समोसे व नंतर मिळालेला ट्रेक साठीचं पहिलं समाधान म्हणजे मित्रांबरोबर उभा राहून पियालेला चहा. आहाहा... त्याचा आनंद आपल्याला तेव्हाच कळतो. पुढे बाघोबा खिंड पर्यंत पोहोचायला आम्ही रिक्षा पकडली व तिथे पोहोचताच कल्पेशला मयूर दादाचा फोन आलेला. आमच्या फोर्ट रायडर्स समूहातील मयूर दादा म्हणजे एक मोठ्या भावासारखा आधार असलेला व्यक्तिमत्व अगदी व्यवस्थित विचारपूस व काळजी घेण्यास सांगणारा आमचा लाडका दादा. नंतर खाली कुठेही वेळ न घालवता आम्ही लगेचच पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तिथे पाण्याच्या पंपाच्या येथेच चढाईला सुरुवात होते. सुरुवात झाल्यावर आम्हाला २०-२५ मिनिटातच थोडा दम लागायला सुरुवात झालेली. अक्षरशः घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या, हृदयाचे ठोके पण वाढू लागले होते आणि डोक्याच्या आतील ठोके वाढून पण ठन ठन आवाज येऊ लागला होता. तिथे थोडा वेळ आम्ही ब्रेक घेतला. कारण बऱ्याच महिन्यांनी आम्ही गिर्यारोहणासाठी निघालेलो त्यामुळे थकवा येणे साहजिकच होते. असं वाटतं होतं कधी पाऊस येतोय आणि कधी आम्ही पावसात भिजून आम्ही वर चढतोय ते. थोडं काही अंतर पार केल्यानंतर आम्हाला एक पठार दिसलं व परत तिथे आम्ही थोडा ब्रेक घेतला नारळवडी व इलेक्ट्रॉल पाणी घेऊन आम्ही थोड्याच वेळात तिथून निघालो. तेथील वनभ्रमण मनाला फार आकर्षक करून घेत होते. थोड्याच वेळात आम्हाला धुके दिसायला सुरुवात झाली व पुढे जाताच आम्हाला स्वर्गात गेल्याचा भास होत होता. हाहाहा.. भास कसला आम्ही खरोखरच स्वर्गात होतो की... वाटेत दिसणाऱ्या गोगलगायी सुद्धा मन आकर्षून घेत होत्या. आम्ही वरच्या शेवटच्या पॅचवर पोहोचल्यावर आम्हाला मनाला एक सुखद आनंद मिळू लागला व आमच्या सर्वांच्या सॅक एका ठिकाणी ठेऊन आम्ही निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला हरवून घेतले.
खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खूण या गडावर नाही. हे एक टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते. वरच्या एका ठिकाणी आम्ही थोडा निवांत वेळ घालवत प्रत्येकांनी आणलेला सुखा खाऊ एकत्र बसून निसर्गाच्या सानिध्यात करून खाऊन घेतला व थोड्याच वेळात परतीच्या प्रवासास सुरुवात केली. गडाच्या खाली खूप प्रमाणात माकडे आहेत, सर्व माकडे माणसाळलेली असल्याने त्यांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावे, पण जरा सांभाळून कारण आपल्या बॅग मधील खाद्यपदार्थांवर त्यांची झडप कधीही येऊ शकते, गडाच्याखाली मन प्रसन्न करणारा एक छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तर इथले वातावरण खूपच सुंदर असते.

हा किल्ला दोन थरांत विभागला आहे. एक, गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ अर्धा एकर असावे. दुसरा विभाग म्हणजे, गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते. पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत.

गडावर जाण्यासाठी
वाघोबा खिंड मार्गे जावावे. वाघोबा खिंडीला जाण्यासाठी लोक मुंबईहुन विरारमार्गे पालघरला किंवा कल्याणहून एस. टी. ने पालघरला येतात व मनोरेला जाणाऱ्या बसने 'वाघोबा' नावाच्या देवळाच्या थांब्यावर उतरतात. येथूनच, देवळाच्या उजवीकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यास माणूस गडावर पोहचू शकतो.


लॉकडाऊन नंतर शितीलथा झाल्यावर २०२१ च्या पहिल्या पावसाळी ऋतू दरम्यान कल्पेश व त्याच्या सहकाऱ्यांबरोबर खूप चांगल्याप्रकारे हा प्रवास व गिर्यारोहण झाला.

पुन्हा भेटू!!!


रविवार, ९ मे, २०२१

मातृवात्सल्य



सकाळी ८ चा अलार्म वाजतो काय आणि दैनंदिन व्यवहारासाठी माझ्या पुढील कार्यासाठी झटापटीने कार्य व्हावे यासाठी तिचा हातभार हा फार मोलाचा ठरतो.

अलार्म वाजल्यानंतर तिचा फक्त एक आवाज उपहार गृहातून येतो.

विकी..... उठ चल!!

पण ती जिथपर्यंत माझा दरवाजा खोलत नाही तिथपर्यंत मी कसला उठतोय...
तिचं ५-६ वेळा मला बोलणं होत नाही तिथपर्यंत बेड काय मला सोडत नाही.. शेवटी मग ८.१० च्या आसपास बेडरूम चा दरवाजा खोलला का समजून जायचं आत्ता हळूच फटका पडणार आहे. या भीतीने, ती दरवाजा उघडायला आणि मी उठायला अशी वेळ जुळून येते. कारण तिच्या हळूच्या फटक्यापेक्षा स्वतःहून उठलेलं चांगलं... मग उठल्यानंतर डायरेक्ट कुठे न जाता माझा हात पहिलं माझ्या खाजगी कपाटामध्ये जातो की आज मी कोणता शर्ट घालू? असा विचार करत २-३ मिनिटं माझी कपाटाच्या समोरच जातात, मग असेल तो शर्ट काढून मी ईस्त्रीसाठी ईस्त्रीच्या टेबल वर काढून ठेवायचा व त्यानंतर मी अंघोळीसाठी निघतो. अंघोळ करून आल्यानंतर माझा जेवणासाठी असलेला डब्बा, माझ्या पाण्याची बाटली आणि माझा ईस्त्रीचा शर्ट हे १० मिनिटाच्या आत तयार करून हॉल मध्ये रेडी करून ठेवलेलं असतं.. लगेच ५ मिनिटांनी माझा सकाळचा नाश्ता सुद्धा हॉल मध्ये येतो. म्हणजे ह्या सर्वात माझी आई व्हर्टिकल लूक अप मारते हे मात्र खरं. ऑफीस मध्ये निघताना तिचा एकचं शब्द असतो. सोन्या, काळजीपूर्वक जा आणि काळजीपूर्वक ये.. घाई घाई असल्यामुळे त्या वाक्यास मी फक्त हा म्हणतो पण जर का कुठे बाहेर कोणत्या विचारांमध्ये असलो का हे वाक्य मला तिचं आठवतंच आठवतं.

बाहेरून घरी आल्यावर सुद्धा तेच
हात पाय धुवून झाल्यावर तिचं मला स्वतःहून सांगणं असतं की विकी तुला नाश्त्यासाठी काय आणून देऊ? कधी कधी तर न सांगताच समोर नाश्ता आलेला असतो.

आजपर्यंत कधी मी रात्रीच्या जेवणासाठी वेळेवर नाही जेवलो पण वेळ झाली की तिचं सारखं बोलणं असतंच असतं की चल जेऊन घे..

आत्ता कोव्हिड चे संक्रमण बाहेर पसरत चालले आहे म्हणून माझा रविवार हा घरी वेळ घालवून निघून जातो. नाहीतर कोव्हिड च्या आधी बहुतेक वेळा रविवारी मुंबईच्याच बाहेर असायचो आणि जर का घरी असलो तर संध्याकाळी मी घरातून निघताना एकच वाक्य तिचं असतं की तू रात्री येणार आहेस ना जेवायला?

हाहाहा, म्हणजे रविवार असला की माझं डिनर बाहेरच असतं हे तिला पण न सांगता माहीत असतं.

असंच सारखं प्रेम तिचं माझ्या शाळेच्या आयुष्यात पण होतं.. पण तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी ह्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. हे मी माझ्या शाळेतील मित्र मंडळींच्या सांगण्यावरून सांगतोय.. हाहा..

एक माझी शाळेतली मैत्रीण व्हॉट्सॲप वर बोलत होती आणि आम्ही जुन्या आठवणींबद्दल बोलत होतो. बोलणं चालू असताना.. हळू हळू शाळेतल्या आठवणी निघू लागल्या.. मी बोललो सांग एखादा माझा शाळेतला किस्सा! किस्से तर खूप निघाले पण आई मला खूप कंटाळायची आणि म्हणायची.. हा बाबा इतकी मस्ती करतो ह्याचा मला अक्षरशः कंटाळा आला आहे, ह्याचं काय करू मी मलाच नाही समजत आहे.. म्हणजे इतकी मस्ती असताना सुद्धा मला तिने सांभाळलं.. हे विशेष!!

आई आहे तर जगातील सर्व सुख आहे. आई खरोखरच खूप वंदनीय आहे हे मात्र अगदी बरोबर आहे. खरं तर तिला सन्मान देण्यासाठी कुठला खास दिवस कशाला पाहिजे? ती तर दररोज खास असते या जगातल्या प्रत्येक मुलामुली साठी. आपल्या संपूर्ण कुटुंबाची ती काळजी घेते ,कष्ट करते, घरासाठी राब- राब राबते.

मातृदिन हे जागतिक पातळीवर साजरे केले जाते. बाहेरच्या देशात आईचे आभार मानण्याची ही एक पद्धत आहे. आईला काही भेट वस्तू देणे, तिच्या सोबतीने वेळ घालवणे इत्या. हा दिवस आपल्या आई वरचे प्रेम, तिची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु प्रश्न असा उद्भवतो की आपण आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करू शकतो का ? ती आपल्या कुटुंबासाठी झटत असते कष्ट करते तरीही कधी थकत नाही. तिच्या मनमिळाऊ व हसमुख स्वभावाने आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी खूप काही करत असते.




रक्षाबंधन च्या दिवशी अगदी हक्काने मला राखी बांधून बहिणीची कमतरता न भासू देणाऱ्या माझ्या आईला माझ्याकडून मानाचा मुजरा.

आज जागतिक मातृदिनानिमित्ताने बऱ्याच मित्रमंडळानी प्रत्येकाच्या आईचे छायाचित्र त्यांनी व्हॉट्सॲप वर ठेवले, मी ही ठेवले.. अगदी आनंदाने.. पण फक्त आजच तिचा दिवस का म्हणून? तिचा तर प्रत्येक दिवस असायला हवा..

मन असं पण बोलतोय की आईचा दिवस तर नसतोच पण प्रत्येक आपला दिवस आईमुळे असतो. या जगातील प्रत्येक मातृत्व लाभलेल्या आईला माझ्याकडून शुभेच्छा..

--/ चंद्रशेखर सावंत


बुधवार, ५ मे, २०२१

Rain or Shine.


Once upon a time in head office, (Ward) was our meeting for office matters and once in it, there was an introduction to Paresh. After the meeting, Paresh spoke to me. Shekhar, I Leaves to You Malad Highway from my vehicle. I'm going to be from there. I do not have a good introduction to a Paresh in that time. In the Branch to the head office or head office to home. When Paresh was with me. If there is any doubt in the work then my first phone to call to Paresh and is still there. One of them is that when we present the subject before him, the first subject is presenting the topic while he is presenting the subject and he gives the correct answer. So, not just in the case, but what is something to say, I share with him. In fact, it is less as much as you write as a friend about him. There is a lot of that, a sincere friend's friend. But till today, I got a very many friendly circle but it is very special with the executive. This is what I wrote about him, that we just met in the evening, and we would like to meet up in the evening and we want to leave. He was 11.15 to take his vehicle and then he went to my home for drop to me and then went to his home.I don't want to describe my friendship with him in such words. But it gave way to my emotions. Wildwhile to me that always lives a happy environment in his life. Life is all about, enjoy every golden movements.

Thanks Parya.. !!

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

कोव्हिड - १९ आणि युद्धभूमी धारावी


महाराष्ट्रात कोव्हिडला सुरुवात झाल्यानंतर काही २-३ महिन्यांनी मुंबईतील धारावी येथे असलेली परिस्थिती फारच वाईट होत चाललेली. दिवसेंदिवस तिकडे कोव्हिडचे रुग्ण वाढत चाललेले, वृत्तपत्र व टिव्हीवर तिकडच्या सर्व माणसांचे हाल बघून डोक्यात सारखे विचार येत होते की हे प्रसंग आपल्यावर ओढावले तर आपले काय हाल होतील? फक्त रात्री न्यूज वर कोव्हिड रुग्णांचा एक सारांश घ्यायचा आणि नंतर झोपण्याचा प्रयत्न करायचं असं सर्व सुरवातीला व्हायचं. त्यावेळी सर्व काही ठप्प झालेलं, इमारतीच्या बाहेर जाण्यासाठी काय कोणाला परवानगी मिळत नव्हती. त्यावेळी इमारतीच्या खाली एक माझ्याकडून एक दैनंदिन कार्यासाठी मदत म्हणून, मी माझा काही वेळ देत होतो. त्याचवेळी मला माझा मित्र सुहृद याचा फोन आला आणि बोलला की शेखर चल आपण या ओढावलेल्या संकटावर एक माणुसकीच्या नात्याने आपण मदतकार्य करूया. कुठे तर धारावीमध्ये स्क्रिनिंग कार्यासाठी आपण निघुयात, तू मला तुझं लवकरच कळव. मी फक्त एकाच दिवसात माझा होकार कळवून दिला व लगेच सुहृद ने त्याच्या वरिष्ठांशी बोलून घेतले व आमच्या दोघांची उपलब्धता कळवली. ह्या सर्वात मी माझ्या आईबाबांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाच कळू न दिलेले होते कारण काय आहे शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची पातळी ही वेगवेगळी असते आणि माझ्यामुळे इतर कोणाला झालेला त्रास हा मला तरी सहन नसता झाला. सुहृदने उपलब्धता दिल्यावर त्याच संध्याकाळी मालाड पश्चिम येथील साई पॅलेस ह्या हॉटेल मध्ये आमची ट्रेनिंग होऊन पुढच्या दिवसासाठी सज्ज झालो ह्या सर्वात विशेष आभार मानावे तर माझे सदैव आदरणीय असलेले CA श्री.श्रीकांतजी व. मराठे व माझ्यासाठी मित्रत्व तसेच प्रसंगी आईसारखं प्रेम देणारी श्रीम. अदिती श्री. मराठे यांच्या विषयी सांगू तितकं कमी असेल. स्क्रिनिंगच्या दिवशी श्रीकांत सर व अदिती काकी खास त्यांची गाडी घेऊन सुहृद व मला सोडण्यासाठी आलेले. आपण धारावी मध्ये जाणार त्यामुळे थोडेफार विचार माझ्या मनामध्ये घोळतच होते पण मराठे कुटुंबीय सोबत असल्यामुळे मी माझ्या भितीपणाला सावरू शकलो व जागोजागी पुढचा विचार करू शकलो. ह्या सर्वात मला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं एकच वाक्य आठवतं जे मला माझ्या श्रीकांत सरांनी आठवण करून दिलेलं ते म्हणजे
देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. ह्या वाक्याला समोर ठेऊन मी व सुहृदने हे सकारात्मक पाऊल उचलले, आमच्या व्यतिरिक्त तिथे सुद्धा असंख्य तरुणाई होती जी मुंबईच्या व मुंबईच्या बाहेरून येऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजसेवा करत होती. तिथे गेल्यानंतर आम्ही चिलखत म्हणून असलेले पी.पी.ई किट घातल्यानंतर मी एका समूहात व सुहृद एका समूहात अशी परिस्थिती झाल्यावर, आम्ही अश्या परिस्थितीत आमच्या समोर असलेल्या मोठ्या आव्हानाला सामोरं जाऊन पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. सर्व काही आमचं ठरल्याप्रमाणे झाल्यावर नंतर जेवण वैगरे झाल्यानंतर गाडीमध्ये आल्यावर मनाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद झालेला की आमच्या मदतीचा एक खारीचा वाटा या समाजासाठी अर्पण झाला. माझ्या समोर तर एकवेळ असा पण प्रश्न उपस्थित झालेला की इथून मी घरी व्यवस्थित जाईन की नाही पण जर घरी नाही गेलो तर समाजासाठी व राष्ट्रासाठी नक्कीच काहीतरी देऊन गेलो याचा एक प्रकारचा अभिमान चेहऱ्यावर फुलत राहिलेला असेल. आज हा दिवस आठवला व ह्याबद्दल मनाच्या वाटा मोकळ्या करून घेतल्या. खरंच श्री. श्रीकांत मराठे व कुटुंबीय यांचे मनापासून आभार..


राष्ट्रप्रथम!!!


--/चंद्रशेखर सावंत



बुधवार, ६ जानेवारी, २०२१

एक आठवणीतला अविस्मरणीय कळसूबाई शिखर

जून महिन्याची सुरवात झाली का वेध लागतात ते गिरी शिखरांवर जायचे वेध लागतात ते निसर्गाच्या सानिध्यात रमण्याचे, वेध लागतात ते सह्याद्री समोर स्वतःला नतमस्तक करवून देण्याचे. अशाप्रकारे प्रत्येक पावसाळा हा माझ्यासाठी किंवा इतर कोणाला खास हा असतोच. एक २०१९ वर्षाची आठवण म्हणजेच च्या पावसाळ्यातील आठवण सांगायची झाली तर आम्ही मित्र परिवार समवेत सर केलेला कळसूबाई शिखर.

काही प्रवास असे असतात की आयुष्याच्या शेवट पर्यंत लक्षात राहतात. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसूबाई शिखर. खरंतर ट्रेक म्हटलं की नियोजन नसून सुद्धा क्षणोक्षणी निघायचे बेत तयार होतात ती मज्जा म्हणजे त्या त्या वेळेलाच कळते. मला शुक्रवारी विनायक चा सकाळी फोन आला आणि म्हणाला की उद्या रात्री आपल्याला कळसूबाईला निघायचे आहे. सकाळी झोपेतून त्याला होकार दिला की निघू म्हणून. तर ठरल्याप्रमाणे शनिवारी म्हणजेच १४ जूनला रात्री मी, विनायक, जितेश, सोहेल, अखिलेश व अमित हे मालाड स्टेशन वरून दादरसाठी रवाना झाले. दादर वरून आम्ही 'अमृतसर एक्स्प्रेस' दिसताच ती ट्रेन फलाटावर लागल्यानंतर सुटेल या भीतीने पुढच्या दिशेला आम्ही लगेच चढलो पण नंतर आत गेल्यावर कळाले की हा डब्बा आर्मी चा आहे. डब्बा पूर्ण स्वच्छ व आर्मी मधील जवान त्यात होते. गिर्यारोहण चा समूह गप्पा गोष्टी व आठवणी शेयर करत आम्ही ३.३० च्या आसपास आम्ही इगतपुरी या स्थानकाच्या इथे पोहोचलो तिथे पोहोचताच आम्ही एस.टी. स्टँड गाठले व तिथे सकाळी ४ च्या आसपास नाष्टा पाणी वैगरे करून घेतले पण कसली भयाण शांतता व काळोख होता तिथे. तो एस.टी.स्टँड न वाटता एक खुले मैदान व एक व्यासपीठ असंच वाटत होतं तिथे. त्यात नाष्टापाणी झाल्यावर जरा एस. टी स्टँड वर पडायचे म्हटले तर तिथे थोडीफार भिती वाटायला लागली कारण आम्हाला तो विभाग नवीन होता. म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेला दिवा असल्यामुळे तिथे येऊन बसलो. थोड्यावेळातच आमच्या डोळ्यावर झोप येऊ लागली व रस्त्यावर पाट टेकून आकाशात चांदण्याच्या छताखाली असलेला आनंद फार मनाला स्वच्छंदी करणारा होता पण काही वेळेतच अचानक तो दिवाही गेला व रस्त्यावरचे कुत्रे भुंकायला लागले हे सर्व बघून आमची झोपच उडाली म्हणून थोड्या वेळात लाईट येताच आम्ही जवळच्या ठिकाणी फेऱ्या मारायला सुरुवात केली. फेऱ्या मारताच जरा पुढे गेल्यावर एक आजी खाटेवरून उपडी पडून एकटक आमच्या समूहाकडे बघतच होती, हे असं दृश्य बघताच आम्हाला काय तिथे थांबावेसे वाटले नाही व परत एस.टी. स्टँड च्या इथेच आलो. सकाळी ०५.३० वाजता बारी या गावी जाणारी एस.टी. आम्हाला स्टँडला उभी असलेली मिळाली व बस मध्ये बसताच आम्ही थोडी झोप घेतली. बारी या गावी पोहोचताच मनाला एक विशिष्ट आनंद मिळू लागला की जे नाव आम्ही शाळेत असताना फक्त भूगोलात बघितलेले त्या नावाचं शिखर आम्ही सर करण्यास राजी झालो आहोत म्हणून. स्थानकाजवळ असलेल्याच खानावळी मध्ये आम्ही चहापान करून घेतला व पुढच्या दिशेला मार्गस्थ झालो. कळसूबाई सर करताना एक विशिष्ट आनंद मनाला भासवत होता. निसर्गाच्या कुशीत जगताना एक नवी उमंग आपल्याला साथ देत असते हे आपल्याला त्या ठिकाणी गेल्यावरच कळतं. मार्गस्थ होत असतानाच आम्हाला कळसूबाई चे मंदिर दिसले तिथे नमस्कार करून पुढेच्या चढाई श्रेणी साठी सज्ज झालो वाटेत निसर्ग मस्त ताजेतवाने झालेला व त्या सोबत आम्हाला सुद्धा अगदी चैतन्यमय वातावरण भरवून देत होता व सांगत होता की या तुमच्या स्वागतासाठी मी सज्ज आहे. निसर्ग समवेत फोटोसेशन वैगरे झाल्यानंतर आम्ही अजून वर वर जात होतो तस तसे आम्हाला धुक्याचा सहवास लाभत होता व स्वर्गात पोहोचल्याचा भास जाणवू लागला.

अक्षरशः डोक्यावर व दाढीवर सुद्धा दवबिंदू तयार झालेले इतक्या थंड प्रमाणात वर वातावरण होतं व तितकीच हवा सुद्धा. थोड्या अंतरावर आम्हाला कळसूबाईचा शेवटचा वरचा पॅच आला व तिथे सुद्धा अफाट हवा होती अक्षरशः कपडे फडफड नुसते वाऱ्याने उडत होते. तिथे थोडा तासभर घालवताच आम्ही वर असलेल्या मंदिरात कळसूबाई मातेचे दर्शन व परतीच्या दिशेला निघालो. खाली उतरताना लगेचच जलदगतीने पण सर्व काळजीपूर्वक आलो व पूर्ण खाली येताच पावसाने हजेरी लावली म्हणजे कळसूबाई यशस्वी पूर्ण झाला म्हणून पावसाने केलेले आमचे स्वागत, असे भासू लागले. पायथ्याशी पोहोचताना उतारा असल्यामुळे सरकत समोरच शेत असल्याने आम्ही अगदी लहान समजून त्या शेतात नाचू लागलो आणि शेतातली माती किती भुसभुशीत असते हे सर्वांना माहीतच असेल त्यामुळे अजुन मज्जा केली. पुढे बारी गावच्या दिशेला पोहोचताच चहापान करताच आम्ही एस.टी. ची वाट बघू लागलो पण एस.टी. काय अजुन येईना. ५.३० झाले तरी काय अजुन एस. टी येईना. शेवटी आम्हाला जीप मिळाली पण ती सुद्धा पूर्ण भरलेली म्हणून त्या जीप चालकानेच सांगितले की तुम्ही जीप च्या टपावर बसा.. व आम्ही सर्वजण बसलो सुद्धा व पुन्हा एकदा जीवाची मज्जा लुटून घेतली.. आयुष्यात आजपर्यंत खूप ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात फिरलो पण कळसूबाई चा पाहिलं गिर्यारोहण हे असं सर्व घडल्यामुळे हा प्रवास आयुष्याच्या शेवट पर्यंत लक्षात राहील.

आपलाच
--/🌝शेखर सावंत