बुधवार, १२ एप्रिल, २०१७

वाचनाच्या वळणावर...






करिअरशी कसरत करत असतानावेळात वेळ काढून केलेले वैचारिक पातळीवरचे योग्यतेचे निर्णय किंवा योग्यता घडवण्यास पात्र ठरणारे बदल, याची विद्वत्ता मला 'वाचनातूनआणि 'लेखनातूनचमिळत राहतेय.
मित्र आणि मैत्रिणींनोएक मात्र खरे... वाचनामुळे ज्ञानात भर पडते तर लिखाणामुळे शब्दरचना कळतातह्या माझ्या दैनंदिनी परिवर्तनामध्ये मी परिपक्व होत राहीन तितका कमीआयुष्यात चुका तर काय होतच राहतात आणि माणसाकडून चूक नाही होणार तर कोणाकडून होणार?  पण त्या सुधारायचा असतील तर योग्य विचारांसाठी योग्य विचारात्मक वाचन व अनुभव हाच उत्तम पर्याय असं मला तरी वाटतं... आणि हाच माझा वक्तशीर छंदतुम्हीही तुमचा योग्य छंद जोपासा कारण हाच छंद तुम्हाला तुमचं आयुष्य घडवण्यास प्रवृत्त करतो व दिशा दाखवून देतो.
आयुष्याच्या वाटेवर जगताना योग्य परिवर्तन घडवणाऱ्या माणसाने योग्य छंद हा अवश्य बाळगावात्यातूनच त्याला नीर-निराळ्या प्रकारचे धडे मिळत राहतातवैफल्यग्रस्त स्थितीमध्ये तर स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण केल्यावर एक समंजस प्रवृत्तीनुसार एक वेगळाच मार्ग अर्थातच आत्मबल आपला वाढू लागतोयाचं मूळ कारण म्हणजे वाचनातून निर्मिती झालेली समंजस प्रवृत्तीची निर्माण होणारी पातळी.            
मोत्याचे मणी सारखेच नसतात, त्याचप्रमाणे बाह्यजगात वावरतानाही अगदी सर्वच काही योग्य विचारांचे नसतात. तर अश्या सर्व गोष्टींना तोंड देऊन ‘वाचन आणि लिखाण’ माझं या जगातील दुसरं आयुष्यसुद्धा! जे मी इच्छा झाल्यावर स्वतःला त्यात हरवूनही घेतो. कारण मला एवढं तर नक्कीच माहिती आहे, अर्थपूर्ण पुस्तके आणि अनुभव कधी खोटं बोलत नाही. पुस्तके व अनुभव माणसाला घडवतात आणि जीवन जगण्याची नवी उमंग देतात. या विचारवादी मनामध्ये बाह्यगोष्टी समजायला लागल्यावर तसेच प्रवासवर्णनीय, चरित्रात्मक तसेच स्मृतीकारक इत्या.  स्वविचारांचे ‘लेख’ किंवा ‘काव्य’ एका लेखणीतून कागदावर अक्षरी उमटवणे असा माझा छंद.

--/ चंद्रशेखर सावंत
मालाड, मुंबई : ४०० ०९७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा